Wednesday 29 August 2018

" तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८"

अहमदनगर जिल्हा , नगर शहर तेली समाज व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित

राज्य स्तरीय, " तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८"


" समाजातील जेष्ठांनी समाज घडविला", हरिभाऊ डाेळसे
" प्रतिभावंतांना प्रोत्साहन द्या, त्यांचा आदर्श  घ्या ", डॉ सुधाकर चाैधरी
 " उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दया", वैभव गायकवाड
 " जेष्ठांचा सन्मान समाजाेपयाेगी स्तुत्य उपक्रम", मधुकर पन्हाळे








बुधवार दि. २२-८-२०१८ राेजी संध्या. ५.०० तेली पंचाचा वाडा, विठठ्ल रूक्मीनी मंदिर येथे अहमदनगर जिल्हा, नगर शहर तेली समाज व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित राज्य स्तरीय, " तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८" उत्साहात पार पडला. काेणताही बाहेरचा पाहुणा न बाेलवता, अहमदनगर जिल्हयातील म्हणजे आपल्याच समाज बांधवांकडून आपल्याच किर्तीवंत, गुणवंत, यशवंत, विद्यार्थी, स्पर्धक, जेष्ठ वयाेवृद्ध इ. समाज बांधव, युवक, युवती यांचा यथाेचीत सन्मान साेहळा सन्मान चिन्ह देऊन संपन्न झाला.
या राज्य स्तरीय सन्मान पुरस्कार साेहळयाचे अध्यक्षपद सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी श्री मधुकर शंकरराव पन्हाळे यांनी भुषविले. सन्मान साेहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित जेष्ठ मान्यवर, गुणवत्ता धारक यांनी दीप प्रज्वलन व श्री संताजी महाराज यांचे प्रतिमा पुजनाने करण्यात आले. 
उदघाटनानंतर माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी, शहीद जवान, समाज बांधव, भगीनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नंतर सर्व मान्यवरांचे गंध, गांधी टाेपी, फेटा बांधुन स्वागत करण्यात आले.
सन्मान साेहळ्याचे कार्यक्रमासाठी  उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे आयाेजक श्री हरिभाऊ डाेळसे यांनी हार फेटा बांधून व शब्द सुमनांनी केले. स्वागत भाषणात श्री हरिभाऊ डाेळसे यांनी मारवाडी, ब्राह्मण समाज जसे एकजुटीने काम करतात, त्यांचे गरीब समाज बांधवांना अडी अडचणी मधे सांभाळून घेतात असा दाखला दिला. त्यांचे चांगले गुण घेणे, आपसातील हेवे दावे मत्सर, द्वेष बाजूला ठेऊन समाज कार्य करावे. समाजातील जेष्ठांनी समाज घडविला, आदर्श माता म्हणून महिलांचे याेगदान जसे आहे तसे समाजातील गुणवंत, प्रतिभावंत व कर्तृत्ववान तसेच समाजाची मान उठविणारे यु.पी.एस.सी. उत्तीर्ण वैभव गायकवाड या सर्वांचा आदर्श समाजापुढे आहे. हा सन्मान साेहळा उपक्रमातून एकाेपा, प्रोत्साहन, समाज बांधव यांचे प्रती आदर भाव निर्माण करणे. दरवर्षी १५ आँगष्ट, स्वातंत्र दिन हा *समाज गाैरव दिवस* साजरा करणे ही परंपरा हया वर्षी सुध्दा आम्ही प्रयत्न पूर्वक जाेपासली असल्याचे श्री डाेळसे यांनी आपले स्वागत भाषणात सांगितले.
सन्मान साेहळ्याचे ध्येय, उद्दीष्ठ, पुरस्कार निवड प्रक्रिया, पुरस्कार स्वरूप याबद्दल प्रास्तविक भाषण डॉ सुधाकर चौधरी यांनी केले. पुरस्कारासाठी निवड करतांना त्या विद्यार्थी, समाज बांधव यांचे कला, क्रीड़ा काैशल्य, वैज्ञानिक अभिरूची, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक कर्तव्य, जबाबदारी, समाजातील प्रतीमा, वागणुक, जेष्ठता या बाबी डाेळयासमाेर ठेऊन पुरस्कारार्थी यांची निवड केली गेली. या पुरस्कारामधे पहिली ते उच्च शिक्षणातील सर्वात सर्वोच्च पदवीत्तर सन्मान पदवी विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी, नेपाळ अंतरराष्ट्रीय स्पर्धेत कराटे क्रीड़ा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता चांदवडकर प्रथमेश लुटे, डॉ सी व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण, शिल्प कला निपुण कला शिक्षक श्री अशोक डाेळसे, राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक व जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करणारे श्री दगडू जाधव व यु पी एस् सी,  नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत भारतात ५५१ व अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, तसेच काैटुंबीक सामाजिक जीवनात वैशिष्ठ पूर्ण कामगीरी केलेल्या समाज माता अश्या ४२ गुणवत्ता धारकांची या साेहळयासाठी निवड केल्याचे चाैधरी म्हणाले. या विशिष्ट गुणवत्ता धारक यशवंत, किर्तीवंत, प्रतिभावंताना समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देणे, समाजाने त्यांचे गुणांची दखल घेउन आदर्श घेणे, त्या प्रमाणे इतरांनी प्रेरणा घेणे,  त्यांचे मार्गदर्शन इतरांनी घ्यावे. या पुरस्कारार्थींना समाज भूषण, विद्या भूषण, कला क्रीड़ा भूषण, बाल वैज्ञानिक असे पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन गाैरविण्यात येत आहे. अश्या साेहळ्याचे निमित्ताने सामाजिक संघटन, सामाजिक बांधिलकी, सदभावना समाज प्रबाेधन घडविणे अशी धारणा असल्याचे प्रा डॉ सुधाकर चाैधरी यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय तैलीक साहू समाज महासभेचे अध्यक्ष आमदार श्री जयदत्ता आण्णा क्षिरसागर यांचा शुभेच्छा संदेश सुद्धा या कार्यक्रमासाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या तेली सन्मान साेहळ्यात पुढील समाज बांधव व भगीनी यांना " समाज भूषण " पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
१. श्री शिवलिंग बबनराव चाैथे अहमदनगर, २. श्री शंकरराव अंबादास सुंदर अहमदनगर तालुका, ३.श्री काेंडीराम त्र्यंबक पतके पारनेर, ४. श्री सुदामराव महादेव गडदे काष्टी, ५. श्री ईश्वर आप्पा त्र्यंबकराव काेटकर पाथर्डी, ६. श्री ताराचंद गुंडाेबा शिंदे शेवगांव, ७. श्री गाेरखनाथ महादेव राऊत जामखेड, ८. श्री दगडू शंकरराव जाधव राहुरी, ९. श्री बाबुराव काशिनाथ महापुरे राहाता, १०. श्री रामनाथ दादा पांबळकर अकाेले, ११. श्री भागवत तुकाराम साळुंके बेलापूर, १२. श्री पंडित माेहनीराज पवार नेवासा, १३. श्री नानाजी बाळाजी भाेत संगमनेर, १४. श्री विठठ्लराव बन्सी भाेज कर्जत, १५. श्री बाबुराव काशिनाथ साळुंके वांबाेरी, १६.श्री अर्जुनराव किसनराव भगत बु-हानगर, १७. श्री विद्याधर नारायण कवडे राजूर, १८. श्रीमती कलावती रामचंद्र दारूणकर (आदर्श माता) अहमदनगर, १९. श्रीमती वत्सलाबाई नारायण देवकर (आदर्श माता) अहमदनगर
पुढील गुणवत्ता धारक गुणवंतांना तेली सन्मान पुरस्काराने उपस्थित मान्यवर मधुकर पन्हाळे, लक्ष्मण देवकर, प्रकाश सैंदर,  संभाजी जाधव, मनाेहर डाेळसे, डॉ सुधाकर चाैधरी, लक्ष्मण डाेळसे, जयवंत कवडे, सुरेश शिंदे, दिलीप साळुंके, कृष्णकांत सांळुके, गाेकुळ काळे, प्रभाकर डाेळसे, गाेकुळ, गाेकुळ बाेकेफाेड,  सुरेश देवकर, रावसाहेब देशमाने, शामराव करपे, संजय पन्हाळे, दत्ता भाऊ साेनवणे, शेख जलालभाई इत्यादिंचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
१. श्री अशोक बाबुराव डाेळसे अहमदनगर, कला शिक्षक - कलाभूषण
२. श्री वैभव रघुनाथ गायकवाड़ पिंपळगांव माळवी, यु.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण- समाज भूषण
३. डॉ श्री नितिन भास्कर राऊत जामखेड, पीएच. डी. - विद्याभूषण
४. कु. प्रियंका सुनिल शेंदुरकर चिंचाेडी पाटील, एम.बी.बी.एस.- धन्वंतरी
५. श्री  आेंकार सुनिल शेंदुरकर चिंचाेडी पाटील, एम.बी.बी.एस.- धन्वंतरी
६. चि. प्रथमेश महेन्द्र लुटे, चांदवड, आंतरराष्ट्रीय कराटे, सुवर्ण पदक - क्रीड़ा भूषण
७.चि. महेश हरीश्चंद्र काळे, अहमदनगर, कराटे, क्रीड़ा भूषण
८. चि. मयुरेश लक्ष्मण लाेखंडे, राहुरी, डॉ सी.व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षा तालुका प्रथम क्रमांक- बाल वैज्ञानिक
९. चि. राेहीत राजेंद्र शेजुळ, राहुरी, डॉ सी.व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण- बाल वैज्ञानिक (उत्तेजनार्थ)
१०. कु. भक्ति अशाेक टेकाडे, जामखेड, बी.ई.- सन्मान
११. श्री आदित्य राजेंद्र क्षिरसागर, लाेणी, बी.ई.- सन्मान
१२. श्री शुभम बाळासाहेब वाळके, काेल्हार, बी.ई.- सन्मान
१३. श्री प्रज्याेत शंकरराव हाडके, राहाता, प्लास्टिक इंजीनियर, पदवीका,- सन्मान
१४. कु. शुभदा डाेळसे, अहमदनगर- फैशन डिजाइनर मेटल स्टार- सन्मान
१५. कु.सुमेधा संजय समरीत, लाेणी, -१२वी विज्ञान- सन्मान
१६. चि.दिपक मधुकर देवकर, अहमदनगर, - १२वी- सन्मान
१७. कु. श्रद्धा डाेळसे, अहमदनगर, १०वी- सन्मान
१८.कु.श्रेयसी प्रमाेद क्षिरसागर, अहमदनगर, इ.१ली, - सन्मान
१९. चि. किसन शंकरराव क्षिरसागर, अहमदनगर, इ.१ली, - सन्मान
२०. चि. उत्कर्ष ढवळे, अहमदनगर- सन्मान
२१.चि. राेहन भगत, अहमदनगर- सन्मान
२२. कु. हर्षदा दहितुले अहमदनगर- बी.ए.- सन्मान
पुरस्कार निवड समीतीमधे डॉ सुधाकर चाैधरी, हरिभाऊ डाेळसे, रमेश साळुंके, अशोक डाेळसे, रावसाहेब देशमाने, संदीप साेनवणे, सचिन म्हस्के, गाेकुळ काेटकर, प्रमाेद डाेळसे, वसंतराव काळे सर, गाेकुळ बाेकेफाेड,  राजेंद्र टेकाडे, राजेंद्र क्षिरसागर, दत्तात्रय साेनवणे, शामराव करपे, श्री रामदास महाराज क्षिरसागर,  शांताराम काळे, आदिनाथ माेरे, इ. समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.
सत्काराबद्दल मनाेगत व आभार व्यक्त तसेच मार्गदर्शन करतांना यु पी एस् सी,  नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत भारतात ५५१ व अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैभव गायकवाड म्हणाले की, " समाजाने माझे पाठीवर शाबासकीची थाप मारून मला प्रोत्साहन दिले,  माझे हातून समाज कार्य व्हावे, हीच अपेक्षा माझ्या शिक्षणासाठी कष्ट करणारे आई, वडील व थाेरामाेठयांची आहे. त्यांचे प्रेम, संस्कारामुळे मी खडतर प्रसंगात अथक परिश्रम करून यु.पी.एस.सी. परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकलाे.आता या कष्टाचे चीज करण्याचे भाग्य मला प्राप्त झाले आहे. त्या प्रमाणे मी समाजिक जबाबदारीची जाणिव ठेऊन कार्य करीन." अशी ग्वाही श्री. गायकवाड़ यांनी उपस्थित समाज बांधव यांना दिली. वैभव गायकवाड पुढे म्हणाले की, " आपले मुलांची क्षमता, कल आेळखूून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दया. मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता मुलींना सुद्धा उच्च शिक्षण दया. हुंडा न देता पैसा मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करा. घरच्या उद्योग व्यवसायात मुलांना  अडकविल्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. समाजामध्ये उच्च शिक्षणाचा अभाव आहे, याचा समाजाने प्रथम विचार करावा".
"चि. वैभव गायकवाड, चि. नितिन राऊत, चि. प्रथमेश लुटे, प्रियंका शेंदुरकर इत्यादी गुणवंत विद्यार्थी, जेष्ठांचा मान सन्मान हा समाजाेपयाेगी स्तुत्य उपक्रम आहे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे आयोजक श्री हरिभाऊ डाेळसे, डॉ सुधाकर चाैधरी व त्यांचे सहका-यांच उद्देश्य सफल झालेला आहे. हा साेहळा राज्य स्तरीय ठरला आहे. हा उपक्रम दरवर्षी राबवावा". असे अध्यक्षीय भाषणात प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी श्री मधुकर पन्हाळे यांनी सुचविले.
या तेली समाज सन्मान पुरस्कार प्रसंगी स्नेहीजन मासिकाचे संपादक श्री छगन मुळे यांनी देखील त्यांची उपस्थिती नाेंदवली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संयुक्तपणे श्री आदिनाथ माेरे व प्रा डॉ सुधाकर चाैधरी यांनी केले.
शेवटी सुरेश देवकर यांनी सर्व संबंधितांचे, उपस्थितांचे, आभार मानले.
पुरस्कार साेहळयास जवळपास २०० समाज बांधव व भगीनी उपस्थित हाेते. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली हाेती.
डॉ सुधाकर चाैधरी, हरिभाऊ डाेळसे, रमेश साळुंके, अशोक डाेळसे, रावसाहेब देशमाने, संदीप साेनवणे, सचिन म्हस्के, गाेकुळ काेटकर, प्रमाेद डाेळसे, वसंतराव काळे सर,  राजेंद्र टेकाडे, राजेंद्र क्षिरसागर, शामराव करपे, श्री रामदास महाराज क्षिरसागर, आदिनाथ माेरे,  लक्ष्मण देवकर, प्रकाश सैंदर,  संभाजी जाधव, मनाेहर डाेळसे, लक्ष्मण डाेळसे, जयवंत कवडे, सुरेश शिंदे, दिलीप साळुंके, कृष्णकांत सांळुके, गाेकुळ काळे, प्रभाकर डाेळसे, गाेकुळ शिंदे, गाेकुळ बाेकेफाेड,  सुरेश देवकर, रावसाहेब देशमाने, शामराव करपे, संजय पन्हाळे, दत्ता भाऊ साेनवणे, उद्धव क्षिरसागर, देविदास ढवळे,  ज्ञानेश्वर काळे, मिलींद क्षिरसागर, बाळकृष्ण दारूणकर, साेमनाथ देवकर, परशराम सैंदर, श्रीकांत साळुंके, देवीदास साळुंके, बबनराव सैंदर, मच्छिंद्र देहाडराय, पेंटर क्षिरसागर, राजू काेटकर, अनिल देवराय, बाबुराव महापुरे, प्रमाेद वाळके, राजेश सटानकर, श्रीकांत वाघ,  शेख जलालभाई, नंदु शिंदे, कृष्णा नागले, संताेष क्षिरसागर, पुरूषाेत्तम सर्जे, शंकरराव हाडके, जयंत कर्डीले, अशाेक वालझाडे, बाबासाहेब जुंदरे, बंडाेपंत शिंदे, शांताराम पाटील, सुभाष दहितुले, किरण शिंदे, किरण भगत, गाेकुळआप्पा शेजुळ, लक्ष्मण लाेखंडे, कैलास शेजुळ, चैताली देवकर, पुनम दारूणकर, मिराताई डाेळसे, अंबटकरताई, मनिषाताई देवकर, मंदाताई डाेळसे, दारूणकर ताई, ऊषाताई सैंदर, लताताई क्षिरसागर, माधुरी पाटील इत्यादिं समाज बांधव व भगीनी यांनी कार्यक्रम यशस्वी हाेणेसाठी परिश्रम घेतलेत व कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शाेभा वाढवली.
                                                   जय संताजी!

No comments:

Post a Comment